२०१३-०५-०७

युईंग्ज अर्बुदे-भाग एकूण ६ पैकी ५

युईंग्ज अर्बुदांचे उपचार करण्यातील सामाजिक, भावनिक आणि इतर पैलू

युईंग्ज कुटुंबातील अर्बुदांची बहुतांशी प्रकरणे कुमारवयात विकसित होत असतात. नवयुवकाच्या आयुष्यातील हा काळ खूपच संवेदनाक्षमतेचा असतो. त्यात, युईंग्ज अर्बुदाचे निदान आणि उपचार यांचा व्यक्तीच्या बाह्य (आऊटवर्ड) दर्शनावर, त्यांच्या स्वतःकडे आणि स्वतःच्या शरीराकडे पाहण्याच्या दृष्टीकोनावर सखोल परिणाम होऊ शकत असतो. नेहमीची कामे ते कशी करतात ह्यावरही त्याचा प्रभाव पडू शकतो. विशिष्ट शाळा, काम किंवा मनोरंजनात्मक क्रिया सुरू ठेवण्याच्या त्यांच्या क्षमतांवरही आघात होऊ शकत असतो. उपचारांदरम्यानच्या पहिल्या वर्षात हा प्रभाव बहुधा सर्वाधिक जाणवत असतो. उपचारकेंद्राने शक्य तितक्या लवकर, कौटुंबिक परिस्थितीचे मूल्यांकन करावे, ज्यामुळे चिंतेचे विषय नीट हाताळले जाऊ शकतील.

सामान्य कौटुंबिक चिंतांमध्ये; आर्थिक तणाव, कर्ककेंद्रापर्यंतचा प्रवास, चरितार्थाचे साधन नाहीसे होण्याची संभावना आणि घरीच शिक्षण मिळण्याची आवश्यकता यांसारख्या काहींचा समावेश होत असतो. अनेक तज्ञ विद्यार्थीदशेतील रुग्णांना शक्य असेल तोवर शाळेत जाऊ देणेच संस्तुत करत असतात. ह्यामुळे त्यांना महत्त्वाचे सामाजिक अनुबंध सांभाळता येऊ शकतात आणि काय घडत आहे ह्याबाबत, मित्रांना सांगू शकण्याची त्यांना संधी मिळते.

मित्र हे आधाराचा एक मोठाच स्त्रोत असतात, पण रुग्णाने हे समजून घ्यायला हवे की, काही लोकांचे कर्काबाबत गैरसमज असतात आणि त्यांना त्याची भीतीही वाटत असते. काही कर्ककेंद्रे शाळेत पुनर्प्रवेशाचा कार्यक्रम राबवत असतात, जे अशा परिस्थितीत उपयुक्त ठरत असतात. अशा कार्यक्रमांत आरोग्य-प्रशिक्षक शाळेस भेट देतात आणि विद्यार्थ्यांना निदानांबाबत, उपचारांबाबत आणि कर्करुग्ण ज्या बदलांमधून जात असतात त्या बदलांबाबत माहिती देतात. वर्गशिक्षकांच्या आणि वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनाही ते उत्तरे देतात.

युईंग्ज अर्बुदे असलेल्या अनेक रुग्णांवर उपचार करणार्‍या केंद्रांत नवीन रुग्णांचा परिचय, उपचार पूर्ण केलेल्या मुलांशी, कुमारांशी करवून देण्याचा कार्यक्रमही असू शकतो. ह्यामुळे रुग्णांना उपचारांदरम्यान आणि नंतरही काय अपेक्षा करावी ह्याची कल्पना येत असते. हे फार महत्त्वाचे असते. युईंग्ज अर्बुदे असलेले इतर रुग्ण बरे झालेले पाहून, रुग्णास प्रेरणा प्राप्त होत असते. ह्याकरता आधारगटही अस्तित्वात असतात जे कसरती करण्यास आणि मुलांच्या हातापायांचा संपूर्ण वापर करण्यास प्रोत्साहन देत असतात. अनेक, हातपाय कापावे लागलेले किंवा त्याबाबत निदान झालेले रुग्ण, कसरतींत भाग घेण्यास समर्थ असतात आणि अनेकदा घेतातही.

जरी ह्या रोगाचा मानसिक धक्का मुलांत आणि कुमारांत सर्वात अधिक स्पष्टपणे जाणवत असला तरी, ह्या रोगाने त्रस्त असलेल्या प्रौढांसमोरच्या आव्हानांकडेही दुर्लक्ष केले जाऊ नये. प्रौढ रुग्णांनाही कर्ककेंद्राच्या शारीरिक, व्यावसायिक आणि समुपदेशनात्मक सेवांचा लाभ घेऊ द्यावा.

युईंग्ज अर्बुदांच्या उपचारांनंतर काय होत असते

युईंग्ज अर्बुदांच्या उपचारांनंतर रुग्णाच्या कुटुंबास वाटणारी सर्वात मोठी काळजी, अर्बुद आणि त्याच्या उपचारांच्या लगेचच्या आणि दीर्घकालीन उप-प्रभावांचीच असते. तशीच अर्बुद पुनरावृत्त होण्याचीही असते.

अर्बुद आणि त्याचे उपचार मागे सोडून पुन्हा कर्काभोवतीच न फिरत राहणार्‍या आयुष्यात यावेसे वाटणे स्वाभाविकच असते. पण हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते की, पाठपुरावा-निगा हा ह्या उपचार प्रक्रियेचा गाभा असतो, जी तुमच्या मुलास दीर्घकाळ टिकून राहण्याची उत्तम संधी मिळवून देत असते.

पाठपुरावा भेटी आणि चाचण्या

एकदा का उपचार संपले की, आरोग्य-निगा-चमू तुमचे पाठपुरावा वेळापत्रक ठरवेल. त्यात कोणकोणत्या चाचण्या कराव्यात आणि किती वारंवार कराव्यात ह्याचाही समावेश असेल. सर्वच पूर्वनिश्चित पाठपुरावा भेटींना जाणे महत्त्वाचे असते. कर्काची पुनरावृत्ती, तसेच काही उपचारांचे संभाव्य तपासण्याकरता उप-प्रभाव त्या आवश्यक असतात. डॉक्टरांकडील भेटी आणि चाचण्या सुरूवातीस अधिक वारंवार केल्या जातात. जर काहीच अपसामान्यता आढळून आल्या नाहीत तर, चाचण्यांदरम्यानचा कालावधी वाढवला जाऊ शकतो.

शारीरिक तपासण्या, क्ष-किरणे आणि इतर चित्रक (संगणित-त्रिमिती-चित्रण, चुंबकीय-अनुनादी-चित्रण, धन-विजक-उत्सर्जक-त्रिमिती-चित्रण किंवा अस्थी-चित्रांकन) चाचण्या अनेकदा केल्या जात असतात. उपचारांनंतर पहिल्या दोन वर्षांत, दर २ ते ३ महिन्यांत एकदा, आणि नंतरच्या वर्षांत कमी वारंवारितेने त्या केल्या जात असतात. जेव्हा युईंग्ज अर्बुद पुन्हा परत येते तेव्हा बहुधा, उपचारांनंतर पहिल्या दोन वर्षांतच ते परतत असते, पण काही वेळेस ते अनेक वर्षांनंतरही परतू शकते, म्हणून निरंतर सतत पाठपुरावा करणे महत्त्वाचे असते.

तुमच्या मुलाचे डॉक्टर उपचारांनंतर उप-प्रभावांची लक्षणे तपासत राहतील आणि शारीरिक उपचारांपश्चातच्या पुनर्वसनावर लक्ष ठेवतील. वाढीचे मापन आणि रक्तचाचण्याही केल्या जातील. रसायनोपचाराचे औषध डोक्सोरिबिसिन (ऍड्रिआमायसिन) हृदयास प्रभावित करू शकत असते, म्हणून हृदय-कार्याचे मापनही (जसे की प्रतिध्वनी हृदयालेखन) केले जाईल.

ह्या वेळेदरम्यान, कुठलीही नवीन लक्षणे दिसून आल्यास ती ताबडतोब डॉक्टरांना सांगायला हवीत, ज्यामुळे कुठलीही समस्या असल्यास ती लक्षात येऊ शकते आणि सर्वाधिक प्रभावीपणे त्यांचा इलाज केला जाऊ शकतो.

कर्कोपचारांचे संभाव्य दीर्घकालीन प्रभाव

कर्कोपचार दिले गेलेली अनेक मुले आता प्रौढ वयापर्यंत टिकाव धरतांना दिसून येत आहेत. डॉक्टरांनाही आता हे कळून आलेले आहे की, उपचारांमुळे ह्या मुलांच्या नंतरच्या आयुष्यावर प्रभाव पडू शकत असतो. म्हणून त्यांची वये वाढत असता, त्यांचेवरील आरोग्य-प्रभावांवर लक्ष ठेवणे अलीकडील वर्षांत आवश्यक ठरत आहे.

तरुणांतील कर्काचे उपचार करण्यास खूपच विशेष वाट अवलंबण्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे उपचारांनंतरची निगा आणि पाठपुरावा यांचीही आवश्यकता असते. जितक्या लवकर समस्या ओळखता येतील, तितक्याच प्रभावीपणे त्यांचा इलाज केला जाऊ शकेल.

कर्क असलेल्या तरुणांना, काही अंशी, कर्कोपचारांच्या अनेक संभाव्य विलंबित प्रभावांचा धोका असतो. हा धोका, कर्काचे आकार आणि स्थान, प्राप्त केलेले विशिष्ट कर्कोपचार, कर्कोपचारांच्या मात्रा, आणि उपचार करते समयीचे रुग्णाचे वय ह्यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ युईंग्ज अर्बुदांवरील शल्यक्रियेपश्चातचे उप-प्रभाव लहानशा व्रणांपासून तर हातापायास मुकावे लागण्यापर्यंतचे असू शकतात, ज्यांसाठी शारीरिक पुनर्वसनाची आणि भावनिक जुळवाजुळवीची आवश्यकता असते. कर्कोपचारांच्या इतर विलंबित प्रभावांत खालील गोष्टींचा समावेश होऊ शकतो.

  • हृदय वा फुफ्फुसाच्या समस्या (काही विशिष्ट रसायनोपचार औषधांमुळे किंवा प्रारणोपचारांमुळे)
  • मंद किंवा घटलेली वाढ व विकास (अस्थींतील किंवा एकूणातीलच)
  • लैंगिक विकासातील आणि मूल होण्याच्या सामर्थ्यातील बदल (खाली पाहा)
  • शिक्षणाच्या समस्या
  • दुसर्‍या कर्काचा विकास (खाली पाहा)

वंध्यत्वः वंध्यत्व हा काही युईंग्ज अर्बुदांच्या उपचारांचा सामान्य परिणाम नाही, पण तो घडून येऊ शकतो. तरूण स्त्रियांच्या रसायनोपचारांदरम्यान, मासिक पाळीचे चक्रात बदल घडून येऊ शकतात, मात्र उपचार समाप्तीनंतर सामान्य चक्र बहुधा पुन्हा प्रस्थापित होत असते. मुले आणि पुरूष यांची शुक्र-निर्मितीची क्षमता नाहीशी होऊ शकते. उपचार समाप्तीनंतर ती पुन्हा प्राप्तही होते. पण त्यातील बीज-संख्या (स्पर्म-काऊंट) कमीच राहू शकते. पुठ्ठ्यास दिलेले प्रारणोपचारही पुनरुत्पादन क्षमतेस प्रभावित करू शकतात.

उपचारांसोबतच्या प्रजननक्षमतेच्या र्‍हासाच्या धोक्याबाबत, तुमच्या कर्क-निगा-चमूशी बोला आणि प्रजननक्षमता अबाधित राखण्याकरता, वीर्यकोशासारखे काही पर्याय उपलब्ध आहेत काय हे विचारा.

दुसरे कर्कः मूळ कर्कातून बर्‍या झालेल्या मुलांना नंतरच्या अयुष्यात इतर कर्क होण्याचा धोका उच्चतर असतो. युईंग्ज अर्बुदांच्या उपचारार्थ उपयोगात आणल्या जाणार्‍या काही रसायनोपचार औषधांमुळे पुढे जाऊन कमी प्रमाणातील मुलांना रक्ताचा कर्क होऊ शकतो. बहुधा असे, उपचारांनंतरच्या पाच वर्षांतच घडू शकते. युईंग्ज अर्बुदांच्या उपचारार्थ प्रारणोपचार दिलेल्यांबाबत आणखी एक चिंता, उपचारांच्या जागीच, नव्या कर्काच्या (बहुधा आणखी एका प्रकारच्या अस्थीकर्काच्या) विकसनाची असते. प्रातिनिधिकरीत्या, प्रारणोपचारांनंतर सुमारे पाच वर्षांनी तो विकसित होऊ लागतो आणि अनेक वर्षेपर्यंत धोका उच्चतरच राहतो. डॉक्टर, प्रचलित उपचारांचा प्रभावीपणा कायम राखत असतांनाच, हा धोका घटविण्याच्या उपायांचा, अभ्यास करत आहेत.

वैद्यकीय अहवालांचे चांगल्याप्रकारे जतन करणे

एकदा उपचार पूर्ण केल्यानंतर मग तो अनुभव मागे टाकणे तुम्हाला जितके हवे वाटत असते, तितकेच त्यादरम्यानच्या वैद्यकीय निगेचे अहवाल चांगल्या प्रकारे जतन करणेही महत्त्वाचे असते. भविष्यात कधीतरी ते शोधण्यापेक्षा, उपचारांनंतर लगेचच ते तपशील गोळा करणे सोपे असते. नंतर तुम्ही डॉक्टर बदलल्यास हे तपशील खूपच उपयुक्त ठरू शकतात. खालील तपशील डॉक्टरकडे आहेत ह्याची खात्री करून घ्या.
  • कुठल्याही नमुना-निष्कर्षण शल्यक्रियेच्या किंवा शल्यक्रियेच्या रोगनिदान अहवालाची प्रत
  • शल्यक्रिया झालेली असल्यास तिच्या तपशीलाचा अहवाल
  • शुश्रुषालयात राहावे लागले असल्यास सुटका-समयीचे सारांश-अहवाल
  • रसायनोपचार दिलेले असल्यास औषधांची, त्यांच्या मात्रांची आणि देण्याच्या काळवेळाची यादी
  • प्रारणोपचार दिलेले असल्यास प्रारणांचा प्रकार, मात्रा देण्याच्या काळवेळाची यादी

आरोग्यविमा राखणेही तितकेच महत्त्वाचे असते. चाचण्या आणि डॉक्टरांना दिलेल्या भेटींना खूप खर्च येत असतो. अर्बुद परत यावे असे कोणालाही वाटत नसते. तरीही असे घडू शकते.

युईंग्ज अर्बुदांच्या संशोधनांत आणि उपचारांत नवीन काय आहे?

युईंग्ज अर्बुदांवरील संशोधन जगभरातील अनेक वैद्यकीय केंद्रांत, विद्यापीठ शुश्रुषालयांत आणि इतर संस्थांत केले जात आहे.

निदान

युईंग्ज अर्बुदांचे अधिक अचूक निदान करण्याची नवीन तंत्रे शास्त्रज्ञ विकसित करत आहेत. युईंग्ज अर्बुदे ओळखण्यासाठी, आणि विशिष्ट उपचार विशिष्ट अर्बुदास किती चांगल्याप्रकारे बरे करतात ह्याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी, अर्बुद-नमुन्याच्या नवीन प्रयोगशालेय चाचण्या (पाहा “युईंग्ज अर्बुदांचे निदान कसे केले जाते?”) अभ्यासल्या जात आहेत.

रसायनोपचार

बहुतेक युईंग्ज अर्बुदे रसायनोपचार, प्रारणोपचार आणि शल्यक्रियांना प्रतिसाद देतात. मात्र, पुनरावर्ती आणि प्रसृत युईंग्ज अर्बुदांचे यशस्वी उपचार विकसित करण्यासाठी, तसेच जे बरे होऊ शकतात त्यांचेकरता कमी अपायकारक उपचार शोधण्यासाठी, अधिक काम करण्याची आवश्यकता आहे. बाल्य-अर्बुदशास्त्र-गट, स्वतंत्र विद्यापीठे आणि बाल्य शुश्रुषालये नवीन रसायनोपचार संयोगांचे अभ्यास करत आहेत, ज्यांत अनेकदा टोपोटेकॅन, इरिनोटेकॅन, टेमोझोलोमाईड, जेम्सिटाबाईन, डोसेटॅक्सेल आणि ट्रॅबेक्टेडिन ह्यांसारख्या नवीनतर औषधांचा समावेश होत असतो.

युईंग्ज अर्बुदे असलेल्या, पण प्रचलित उपचारांचा उपयोग करून बरे होणे असंभवनीय असलेल्या रुग्णांकरता, संशोधक, मूल-पेशी-प्रत्यारोपणासह उच्च-मात्रा रसायनोपचारांचाही अभ्यास करत आहेत.

लक्ष्यवेधी उपचारपद्धती

“आपण युईंग्ज अर्बुदांची कारणे जाणतो काय?” ह्या अनुभागात नोंद केल्यानुसार, युईंग्ज अर्बुदे निर्माण होण्यासाठी कारण ठरणार्‍या जनुका व रंगसूत्रांतील बदलांबाबतच्या आपल्या आकलनात खूप प्रगती होत आहे. हे ज्ञान, कर्क संवेदनाकरताच्या खूप संवेदनाक्षम प्रयोगशालेय चाचण्या विकसित करण्याकरता यापूर्वीच वापरले गेलेले आहे. आता डॉक्टर, उपचारांची निवड करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून, ह्या चाचण्यांचा सर्वोत्तम उपयोग कसा करून घेता येईल ह्याचा अभ्यास करत आहेत.

युईंग्ज अर्बुदांतील जनुकीय बदलांवर अधिक संशोधन नवीन औषधांप्रत घेऊन जाईल, जी ह्या कुटुंबातील अर्बुदांकरता कारण ठरत असल्याचे दिसत असलेल्या प्रथिनांना लक्ष्य करतील. (अशा उपचारांत युईंग्ज अर्बुद पेशींतील हानीग्रस्त जनुका बदलविल्या जातील, म्हणून ह्या उपचारांना जनुका-उपचार किंवा जनुकोपचार म्हणता येईल).

काही नवीन औषधे जी युईंग्ज अर्बुद पेशींतील विशिष्ट बदलांना लक्ष्य करतात, त्यांची चाचणी आधीच सुरू झालेली आहे. उदाहरणार्थ अशी औषधे, जी इन्सुलीनसारख्या वाढ-घटक-ग्राहक-१ ह्या प्रथिनास लक्ष्य करतात. कर्क पेशींवरील इन्सुलीनसारखे वाढ-घटक-ग्राहक-१ हे प्रथिन त्यांच्यात वाढ घडवून आणते. त्यांचा वैद्यकीय चाचण्यांत अभ्यास होत आहे. सुरूवातीच्या अभ्यासांत असे आढळून आलेले आहे की ही औषधे काही युईंग्ज अर्बुदांचा संकोच घडवून आणतात आणि काहींची वाढ मंदावतात. आजवर हा लाभ बव्हंशी प्रकरणांत तात्पुरत्या स्वरूपाचा राहिलेला आहे. संशोधक अशा औषधांचा आणि त्यांच्या इतर लक्ष्यवेधी औषधांसोबतच्या, तसेच प्रचलित औषधांसोबतच्या संयोगांचा अभ्यास पुढे चालूच ठेवत आहेत.

युईंग्ज अर्बुदांच्या उपचारार्थ अभ्यासली जात असलेल्या इतर नवीनतर औषधांत खालील औषधांचा समावेश होत असतो.

  • असे औषध जे अर्बुदाच्या नवीन रक्तवाहिन्या निर्माण करण्याच्या सामर्थ्यास प्रभावित करते, जसे की बेवासिझुमाब (अवस्टिन) आणि सोराफेनिब (नेक्सावर)
  • अशी औषधे जी एम.टी.ओ.आर. प्रथिनास लक्ष्य करतात, जशी की टेमसिरोलिमस (टोरिसेल) आणि एव्हेरोलिमस (अफिनिटोर)


युईंग्ज अर्बुदे-भाग एकूण ६ पैकी ४

युईंग्ज अर्बुदांकरताची प्रारणोपचार-पद्धती

प्रारणोपचार पद्धती कर्कपेशी मारण्याकरता, उच्च-ऊर्जा प्रारणांचा उपयोग करत असते. युईंग्ज अर्बुदे असलेल्या व्यक्तींत प्रारणोपचार पद्धतीचा उपयोग शल्यक्रियेसोबतच किंवा शल्यक्रियेऐवजी केला जाऊ शकतो. विशेषतः जर शल्यक्रियेद्वारे अर्बुद संपूर्णपणे काढून टाकणे कठीण असेल तर. दोन्हीही प्रकरणांत उपचारांपूर्वी, दरम्यान आणि नंतरही रसायनोपचार दिले जातात.

बाह्य-शलाका-प्रारण-उपचार-पद्धत, शरीराबाहेरील यंत्राद्वारे, कर्कावर उच्च-ऊर्जा शलाका केंद्रित करत असते. युईंग्ज अर्बुदांच्या उपचारार्थ ह्याच प्रकारची प्रारण-उपचार-पद्धत बहुतेकदा वापरली जात असते.

उपचार सुरू होण्यापूर्वी, प्रारण-चमू चुंबकीय-अनुनाद-चित्रक चित्रांकनासारख्या चित्रक चाचण्यांची मापने काळजीपूर्वक नोंदविते, ज्यामुळे प्रारण-शलाका केंद्रित करण्याचे सुयोग्य कोन निर्धारित केले जाऊ शकतात आणि सुयोग्य प्रारणमात्रा दिली जाऊ शकते.

बाह्य-प्रारण-उपचार-पद्धत बरीचशी क्ष-किरण प्राप्त करण्यासारखीच असते, मात्र त्यातील प्रारणमात्रा खूपच जास्त असते. प्रत्येक सत्राकरता, तुमचे मूल एका विशेष टेबलावर पडून राहते. यंत्र नेमक्या कोनातून प्रारण पुरवते. हे उपचार दुःखकारक नसतात.

प्रत्येक उपचार-सत्र केवळ काही मिनिटेच चालत असते, पण उपचारार्थ मुलास स्थिर करण्याची जुळणी करण्यास लागणारा अवधी बहुधा मोठा असतो. काही मुलांना उपचारांपूर्वी झोप येणारी औषधे दिली जातात. बहुतेकदा प्रारणोपचार सप्ताहांतून पाचदा, ह्याप्रकारे अनेक सप्ताह दिले जात असतात.

काही नवीन प्रारण तंत्रे डॉक्टरांना प्रारण अधिक नेमकेपणे केंद्रित करू देतात.

त्रिमिती सारूप्य प्रारणोपचार पद्धती (३-डी.-सी.आर.टी.): त्रिमिती सारूप्य प्रारणोपचार पद्धती, चुंबकीय-अनुनादी-चित्रक चित्रांकनासारख्या चित्रक चाचणीचे निष्कर्ष आणि अर्बुदाचे स्थान नेमकेपणाने निश्चित करण्याकरता विशेष संगणक वापरत असते. अनेक प्रारण-शलाकांना मग आकार देऊन त्या अर्बुदावर निरनिराळ्या दिशांनी केंद्रित केले जाते. प्रत्येक शलाका स्वतःहून खूपच अशक्त असते, ज्यामुळे शरीरातील सामान्य ऊतींना तिच्यापासून हानी पोहोचणे कमी संभवते. मात्र, शलाका अर्बुदावर केंद्रित होत असल्याने, तिथे उच्च प्रारण-मात्रा प्राप्त होऊ शकत असते. तुमचे मूल त्याच्या शरीराच्याच आकाराच्या प्लास्टिकच्या साच्यात पडून राहत असल्याने त्याची जागा एकसारखीच राहते आणि प्रारणाचा नेम अधिक अचूकतेने धरला जाऊ शकतो.

प्रखरता-नियमित-प्रारणोपचार-पद्धती(इंटेन्सिटी मॉड्युलेटेड रेडिएशन थेरपी - आय.एम.आर.टी.): ही उपचारपद्धती म्हणजे त्रिमिती उपचारपद्धतीचे एक प्रगत स्वरूप आहे, जे पाठीच्या कण्यानजीकच्या अर्बुदांकरता विशेषत्वाने उपयोगी ठरत असते. शलाकांना आकार देऊन अनेक कोनांतून अर्बुदावर केंद्रित करण्याशिवाय, सर्वाधिक संवेदनाक्षम सामान्य ऊतींप्रत पोहोचणार्‍या प्रारणाची तीव्रता मर्यादित करण्यासाठी, शलाकांची प्रखरताही जुळवून घेतली जाऊ शकते. ह्यामुळे डॉक्टर अर्बुदास उच्चतर प्रारण-मात्रा पोहोचवू शकतात. अनेक प्रमुख शुश्रुषालये आणि कर्ककेंद्रे हल्ली ही पद्धत वापरतात. विशेषतः पाठीच्या कण्याच्या वा पुठ्ठ्याच्या हाडानजीक सारख्या, उपचारास अवघड जागी असलेल्या अर्बुदांकरता.

सारूप्य धनक-शलाका प्रारणोपचार पद्धतीः धनक-शलाका प्रारणोपचार पद्धत ही ३-डी.-सी.आर.टी. पद्धतीशी संबंधित असते आणि तिच्यासारखीच वाट चालत असते. मात्र क्ष-किरणे वापरण्याऐवजी ती अर्बुदांवर धनक-शलाका केंद्रित करत असते. धनक हे अणूचे धन भागधारक कण असतात. लक्ष्यात प्रवेश करण्यापूर्वी आणि नंतरही ऊर्जा-विमोचन करत असणार्‍या क्ष-किरणांच्या उलट ते ज्या ऊतींतून पार होतात त्यांना फारशी हानी पोहोचवत नाहीत आणि काही अंतर चालून गेल्यानंतर ते ऊर्जाविमोचन करत असतात. डॉक्टर ह्या गुणधर्माचा उपयोग करून घेऊन अर्बुदास अधिक ऊर्जा देतात आणि नजीकच्या सामान्य ऊतींना कमी हानी होऊ देतात.

आय.एम.आर.टी. प्रमाणेच ह्या पद्धतीतही, पाठीच्या कण्याच्या वा पुठ्ठ्याच्या हाडानजीक सारख्या, जागी असलेल्या व म्हणून उपचारास कठीण असलेल्या अर्बुदांवरही उपचार केले जाऊ शकतात. धनक तयार करण्यास लागणारे यंत्र महाग असते आणि सद्य स्थितीत अमेरिकेत तसली केवळ काही यंत्रेच अस्तित्वात आहेत.

प्रारणोपचार पद्धतीचे संभाव्य उप-प्रभाव

प्रारणोपचार पद्धतीच्या संभाव्य (विशेषतः वाढत्या वयातील मुलांतील) उप-प्रभावांमुळे, शल्यक्रिया शक्य असल्यास अनेकदा पसंत केली जाते. पण प्रारणोपचार पद्धतीच्या अंमलातील सुधारणांमुळे, युईंग्जअर्बुदे असलेल्या मुलांवर भूतकाळातल्या मानाने कमी मात्रेचे प्रारणोपचार करणे शक्य झालेले आहे. त्यामुळे ह्यांपैकी काही उप-प्रभाव कमी होण्यास मदत होत आहे.

प्रारणोपचार पद्धतीचे उप-प्रभाव प्रारणमात्रेवर आणि ते कुठे केंद्रित केले जातात ह्यावर अवलंबून असतात. काही प्रभाव अल्पकालीन असू शकतात, तर इतर दीर्घकालीन प्रभाव असू शकतात.

अल्पकालीन समस्यांत, प्रारण ग्रहण करणार्‍या भागातील त्वचेवर होणारे प्रभाव समाविष्ट असू शकतात, जे सौम्य त्वचा काळवंडण्या आणि केसगळतीपासून, तर अधिक गंभीर त्वचा प्रतिक्रियांपर्यंतच्या पल्ल्यातील कुठलेही असू शकतात. पुठ्ठ्यास मिळणार्‍या प्रारणामुळे मळमळणे, अतिसार आणि मूत्रासंबंधी समस्या उद्‌भवू शकतात.

दीर्घकालीन उप-प्रभाव अधिक गंभीर स्वरूपाचे असू शकतात. विशेषतः वाढत्या मुलांत. म्हणून डॉक्टर त्यांना शक्य तितके मर्यादित राखण्याचा प्रयत्न करत असतात.

मुलांतील प्रारणोपचार पद्धतीची एक गंभीर समस्या ही आहे, की त्यामुळे अस्थींच्या वाढीस अडथळा होऊ शकतो. प्रारणोपचारांनंतर लहान मुलांत काही अस्थी वाढत नाहीत. उदाहरणार्थ, एका पायातील अस्थीस प्रारणोपचार दिलेले असल्यास, तो दुसर्‍यापेक्षा आखूड राहू शकतो. चेहर्‍याच्या हाडांना दिलेले प्रारणोपचार असमान वाढ घडवू शकतात, ज्यामुळे मुलाचे ’दिसणं’ प्रभावित होऊ शकते. पण जर मुलाची पूर्ण वा बहुतांशी पूर्ण वाढ झालेली असेल तर, हा मुद्दा उपस्थित होण्याची संभावना कमी असते.

प्रारणाचा रोख (एम) कुठे आहे त्यावर अवलंबून, ते प्रारण इतर अवयवांसही हानी पोहोचवू शकत असते. छातीच्या भिंतींना किंवा फुफ्फुसास दिलेले प्रारण हृदयाचे कार्य प्रभावित करू शकत असते. पुठ्ठ्यास दिलेले प्रारण मूत्राशय किंवा आतड्यांस हानी पोहोचवू शकत असते. ते प्रजनन इंद्रियांनाही हानी पोहोचवू शकत असते, ज्यामुळे नंतरच्या आयुष्यात प्रजननक्षमता प्रभावित होऊ शकते. म्हणून डॉक्टर हे अवयव सुरक्षित राखण्यासाठी, त्यांना ढाल पुरवून किंवा शक्य असेल तिथे त्यांना प्रारणमार्गातून दूर करून, सर्वाधिक काळजी घेत असतात.

प्रारणोपचार पद्धतीच्या मज्जारज्जू वा मेंदूस होणार्‍या उप-प्रभावांत मज्जातंतूहानी, डोकेदुखी आणि विचार करण्यात येणार्‍या अडचणींचा समावेश होत असतो ज्या, उपचारांनंतर १ वा २ वर्षांनी सर्वात गंभीर स्वरूप धारण करतात. सुदैवाने, युईंग्ज अर्बुदे क्वचितच मेंदूत प्रसृत होत असतात, मात्र काही वेळेस, ती जवळपासच्या कवटीच्या अस्थींतून मेंदूपर्यंत विस्तारतात.

प्रारणोपचार पद्धतीसोबत आणखी एक प्रमुख चिंता असते ती म्हणजे, प्रारणोपचार दिल्या गेलेल्या शरीराच्या भागात नवा कर्क निर्माण होण्याची. हा बहुधा निराळ्या प्रकारचा अस्थीकर्क असतो ज्याला ऑस्टिओ-सार्कोमा म्हणून ओळखले जाते. जितकी प्रारणमात्रा जास्त तितकी हा कर्क होण्याची शक्यता जास्त. उपचारांची आवश्यकता असलेल्या मुलांना ह्या छोट्याशा धोक्यापायी उपचार मिळण्यापासून वंचित राहावे लागू नये. तरीही, तुमच्या मुलाच्या डॉक्टरांकडील पाठपुरावाभेटी चालूच ठेवणे महत्त्वाचे असते, ज्यामुळे समस्या उद्‍भवल्या असतील तर त्या दिसून येतात आणि लवकरात लवकर त्यांचा इलाज केला जातो.

युईंग्ज अर्बुदांकरता उच्च-मात्रा रसायनोपचार आणि मूलपेशी प्रत्यारोपण

युईंग्ज अर्बुदे असलेल्या अशा रुग्णांकरता, हे उपचार अभ्यासले जात आहेत, ज्यांना इतर उपचार देणे शक्य नसते. उदाहरणार्थ प्रसृत रोगाचे रुग्ण वा प्रमाणित उपचारांनंतर ज्यांना पुन्हा पुन्हा रोगाचा प्रादुर्भाव होत असतो असे रुग्ण. ह्यात खूप उच्च मात्रेतील रसायनोपचार दिले जात असतात, व त्यानंतर उपचारांनी मारल्या गेलेल्या, शरीरातील अस्थीमज्जा-पेशी बदलविल्या जात असतात. जेव्हा ही पद्धत वापरण्यात येते तेव्हा, रुग्णास प्रथम प्रमाणीत रसायनोपचार दिले जातात, आणि नंतर उच्च-मात्रा-रसायनोपचार व त्यानंतर त्यांचेवर मूलपेशी प्रत्यारोपण केले जात असते.

भूतकाळात अशा उपचारांना सामान्यपणे अस्थीमज्जा-प्रत्यारोपण म्हणून संदर्भिले जाई. अस्थीमज्जा म्हणजे काही अस्थींच्या आतील मऊ भाग जिथे नवीन लाल, पांढर्‍या रक्तपेशींची आणि बिंबाणूंची निर्मिती होत असते. लाल-रक्तपेशी शरीराच्या सर्व भागांत प्राणवायू वाहून नेतात. पांढर्‍या-रक्तपेशी शरीरास, संसर्गाचा सामना करण्यास मदत करतात. बिंबाणूंची, रक्त साखळून रक्तस्त्राव थांबवण्याकरता आवश्यकता असते.

रसायनौषधींच्या सामान्य मात्रा, अस्थीमज्जापेशीप्रमाणे जलदीने विभाजित होणार्‍या पेशींना प्रभावित करत असतात. जरी ह्या रसायनौषधींच्या उच्चतर मात्रा अर्बुदाच्या उपचारार्थ अधिक प्रभावी ठरत असल्या तरी, त्या दिल्या जाऊ शकत नाहीत कारण त्या अस्थीमज्जेस गंभीररीत्या हानी पोहोचवू शकतात, ज्यामुळे रक्तपेशींची प्राणघातक कमतरता निर्माण होऊ शकत असते.

ह्या समस्येचे समाधान शोधण्याकरता, डॉक्टर मुलास उच्च-मात्रा रसायनोपचार देतात आणि नंतर अस्थीमज्जेस ’मुक्त’ करण्यासाठी, परिघीय रक्त-मूल-पेशी प्रत्यारोपण करतात.

परिघीय रक्त-मूल-पेशी प्रत्यारोपणात काय होत असते

अशा प्रत्यारोपणात पहिली पायरी, मुलातील स्वतःच्या मूल-रक्त-पेशी गोळा करून नंतर वापराकरता त्यांचे उत्पादन करणे ही असते. ह्या पेशी निरनिराळ्या प्रकारच्या रक्तपेशींची निर्मिती करत असतात. अशा प्रकारचे प्रत्यारोपण, ज्यात (दुसर्‍या व्यक्तीपासूनच्या घेण्याऐवजी) रुग्णाच्याच  मूलपेशी काढून घेऊन वापरल्या जातात त्यास, स्वतनूगत-प्रत्यारोपण (ऑटोलॉगस ट्रान्सप्लँट) म्हटले जाते.

भूतकाळात मुलांच्या अस्थीमज्जेतून मूलपेशी अनेकदा काढून घेतल्या जात असत, ज्याकरता किरकोळ शल्यक्रियेची आवश्यकता भासत असे. मात्र डॉक्टरांना असे आढळून आलेले आहे की अशा पेशी रक्तप्रवाहातूनही घटक-वगळ पद्धतीने काढून घेता येऊ शकतात. हे रक्तदानासारखेच असते, मात्र रक्त गोळा करणार्‍या पिशवीत रक्त जाण्याऐवजी ते, एका यंत्रात जाते, जे त्यातून मूलपेशी गाळून घेते आणि उर्वरित रक्त परत रुग्णाच्या शरीरात पाठवले जाते. मूलपेशी मग प्रत्यारोपण करेपर्यंत गोठवल्या जातात. असे एकाहून अधिक वेळा करण्याची आवश्यकता भासू शकते.

एकदा का मूलपेशी साठवल्या, की मग मुलास उच्च-मात्रा-रसायनोपचार दिले जातात, काही वेळेस प्रारणोपचारांसोबतच ते दिले जात असतात. उपचार संपताच, रुग्णाच्या मूलपेशी पुन्हा उबदार करून सामान्यतः रक्त काढून घेतात तशाच पद्धतीने शरीरात शिरवल्या जातात. मूलपेशी रक्तप्रवाहातून प्रवास करतात आणि अस्थीमज्जेत स्थिरावतात. त्यानंतरच्या ३ ते ४ सप्ताहांपर्यंत त्या नवीन, आरोग्यपूर्ण रक्तपेशी निर्माण करू लागतात.

हे होईपर्यंत पांढर्‍या पेशी कमी असत असल्याने, मुलास संसर्गाचा धोका असतो आणि बिंबाणू कमी असत असल्याने रक्तस्त्रावाचाही धोका असतो. संसर्ग टाळण्याकरता, शुश्रुषालयातील हवेकरता विशेष गाळण्यांसारखे आणि भेटी देणार्‍यांस संरक्षक कपडे परिधान करावयास देण्यासारखे, सुरक्षिततेचे उपाय योजिले जातात. रक्त आणि बिंबाणूंचा पुनर्प्रवेश आणि शिरेतून प्रतिजैविक औषधांद्वारे उपचार यांचा वापरही, संसर्ग व रक्तस्त्रावाच्या समस्या टाळणासाठी किंवा उपचारार्थ केला जाऊ शकतो.

व्यावहारिक मुद्दे

मूलपेशी-प्रत्यारोपण हे क्लिष्ट उपचार आहेत, ज्यांचे प्राणघातक उपप्रभाव होऊ शकतात. जर डॉक्टरांना तुमच्या मुलास त्यांचा उपयोग होईल असे वाटत असेल तर, राष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त असलेले कर्ककेंद्रच त्याकरता सर्वोत्तम जागा ठरेल, जिथे कर्मचार्‍यांना अशा प्रक्रियांचा अनुभव असतो आणि बरे होण्याच्या काळाचे व्यवस्थापन ते योग्य प्रकारे करू शकतात.

मूलपेशी-प्रत्यारोपणास दीर्घकाळ शुश्रुषालयात राहणे आवश्यक ठरू शकते आणि ते खर्चिकही ठरू शकते (अनेकदा ते लक्ष डॉलर्सहूनही अधिक खर्चाचे ठरत असते). ही प्रक्रिया तुमच्या मुलास संस्तुत करण्यात आल्यास, ती इतकी महाग असल्याने, तुमच्या विमादात्याकडून उपचारांपूर्वी त्यांकरता लिखित स्वरूपात संमती घ्यावी. जरी प्रत्यारोपण तुमच्या विमादात्याकडून छत्रप्राप्त असेल तरीही, तुम्हाला सोबतच करावे लागणारे व इतर खर्च सहजच हजारो डॉलर्स इतके होऊ शकतात. तुमचा विमादाता कशाकशाकरता छत्र पुरवेल, आणि कायकाय खर्च तुम्हाला स्वतःच सोसावा लागेल, हे आधीच शोधून काढणे महत्त्वाचे ठरते.

संभाव्य उपप्रभाव

सुरूवातीच्या संभाव्य गुंतागुंती आणि उप-प्रभाव मूलतः कुठल्याही उच्च-मात्रा-रसायनोपचारामुळे होऊ शकतात तसेच असतात (ह्याकरता ह्या दस्ताचा “रसायनोपचार पद्धती” हा अनुभाग पाहा) आणि गंभीरही असू शकतात. ते अस्थीमज्जेस आणि इतर जलदीने विभाजित होणार्‍या शरीरातील ऊतींना पोहोचलेल्या हानीमुळे घडून येत असतात. त्यांत खालील गोष्टींचा समावेश होत असतो.
  • निम्न रक्त-पेशी-गणना (थकवा आणि संसर्ग व रक्तस्त्रावाच्या वाढत्या धोक्यासहित)
  • मळमळणे आणि वांत्या
  • भूक कमी लागणे
  • तोंड येणे
  • अतिसार
  • केसगळती

एक सर्वात सामान्य आणि गंभीर अल्पकालीन प्रभाव म्हणजे, संसर्गाचा वाढलेला धोका. हे टाळण्याकरता अनेकदा प्रतिजैविके दिली जात असतात. निम्न-लाल-रक्त-पेशी आणि बिंबाणू गणना यांसारख्या इतर उप-प्रभावांमुळे रक्त-घटक अंतरणांची अथवा इतर उपचारांची आवश्यकता पडू शकते.

काही गुंतागुंती आणि उप-प्रभाव दीर्घकाळ टिकून राहू शकतात किंवा उपचारांनंतर अनेक वर्षांपर्यंत व्यक्तही होत नाहीत. त्यांत खालील गोष्टींचा समावेश होत असतो.
  • फुफ्फुसास होणारी प्रारणहानी
  • अवटू ग्रंथी किंवा इतर अंतर्स्त्रावजनक ग्रंथींच्या समस्या
  • प्रजनन समस्या
  • अस्थीहानी किंवा अस्थीवर्धनाच्या समस्या
  • अनेक वर्षांनंतर दुसर्‍या कर्काचा विकास (ज्यात रक्तकर्काचाही समावेश असत असतो)

प्रत्यारोपणापूर्वी संभाव्य दीर्घकालीन प्रभाव जाणून घेण्याकरता, तुमच्या मुलाच्या डॉक्टरांशी बोला.

युईंग्ज अर्बुदांकरताच्या वैद्यकीय चाचण्या

तुम्हाला कर्क आहे असे सांगण्यात आल्यानंतर तुम्हाला खूप निर्णय घ्यावे लागले असणार. एक सर्वात महत्त्वाचा निर्णय हा की, कुठले उपचार सर्वोत्तम ठरतील. तुम्ही ह्या प्रकारच्या कर्कावर केल्या जाणार्‍या वैद्यकीय चाचण्यांबाबतही ऐकलेलेच असणार. किंवा तुमच्या आरोग्य-निगा-चमूतील कुणीतरी तुम्हाला वैद्यकीय चाचण्यांबाबत सांगितले असू शकेल.

वैद्यकीय चाचण्या म्हणजे त्याकरता स्वतःहून तयार असलेल्या रुग्णांवर केलेला काळजीपूर्वक नियंत्रित संशोधन अभ्यास. हे अभ्यास आशादायी, नवीन उपचार किंवा पद्धतींचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठीच हाती घेतले जात असतात.

वैद्यकीय चाचण्यांत सहभागी होण्याकरता काही आवश्यकता पूर्ण कराव्या लागत असतात. जर तुम्ही त्या पूर्ण करत असाल तर त्या चाचणीत सहभागी व्हायचे की नाही हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. वयस्कर मुले, जी अधिक जाणत असतात, तीही बहुधा वैद्यकीय चाचण्यांत सहभागी होण्याकरता सहमत असावी लागतात. हा निर्णय, पालकांचा निर्णय स्वीकारला जाण्यापूर्वीच घेतला जातो.

वैद्यकीय चाचण्या हा अद्ययावत स्वरूपाच्या तंत्राची कर्कनिगा प्राप्त करण्याचा एक उपाय आहे. डॉक्टरांना कर्कोपचाराच्या चांगल्या पद्धती जाणून घेण्याचाही केवळ तोच एक मार्ग आहे. तरीही अशा चाचण्या प्रत्येकाकरता योग्यच ठरतील असे नाही.

युईंग्ज अर्बुदांकरताच्या पूरक आणि पर्यायी उपचारपद्धती

तुम्ही कर्कोपचाराच्या किंवा लक्षणमुक्तीच्या, अशा उपायांबाबत ऐकाल, जे मुख्य (प्रमाणित) वैद्यकीय उपचारांहून निराळे असतील. मित्र आणि कुटुंबातील प्रत्येकच जणापासून तर महाजालावरील गट आणि संकेतस्थळेही उपाय सुचवू शकतील. अशा पद्धतींत जीवनसत्त्वे, वनौषधी, विशेष आहार किंवा अक्युपंक्चर, मालिश यांसारख्या इतर पद्धतींचा समावेश असू शकेल.

पूरक आणि पर्यायी उपचारपद्धती नेमक्या काय असतात

प्रत्येकच जण ह्या परिभाषा एकाच अर्थाने वापरत नाही आणि त्यांचा अर्थ अनेक निरनिराळ्या पद्धती असा होत असतो, म्हणून हे गोंधळाचे ठरू शकते. आपण पूरक उपचारांचा अर्थ, तुमच्या नियमित वैद्यकीय निगेसोबतच घेतले जाणारे उपचार असा करत आहोत. पर्यायी उपचार म्हणजे डॉक्टरांच्या वैद्यकीय उपचारांऐवजी घेतले जाणारे उपचार असा अर्थ आपण घेत आहोत.

पूरक उपचार पद्धतीः बव्हंशी पूरक उपचार पद्धती कर्क बरा होण्याकरता दिल्या जात नाहीत. मुख्यतः ते कर्करुग्णास बरे वाटावे म्हणूनच दिले जात असतात. नियमित उपचारांसोबत दिले जाणारे काही उपचार हे, तणावमुक्तीकरता दिले जाणारे कला-उपचार किंवा क्रीडा-उपचार असतात. दुःखमुक्तीकरता अक्युपंक्चरचे उपचार दिले जातात. मळमळ नाहीशी करण्याकरता पेपरमिंट चहा दिला जातो. काही पूरक उपचार उपयोगी ठरतात असे आढळून आलेले आहे. इतर उपाय अजून तपासले गेलेले नाहीत. काही उपाय उपयुक्त ठरत नाहीत असे सिद्ध झालेले आहे आणि काही तर हानीकारकही असतात असे आढळून आलेले आहे.

पर्यायी उपचार पद्धतीः  पर्यायी उपचार पद्धती कर्क बरा करणार्‍या म्हणूनही दिल्या जातात. अशा पद्धती, वैद्यकीय चाचण्यांत, सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झालेले नाही. ह्यांपैकी काही पद्धती धोकादायक ठरू शकतात किंवा त्यांचे उप-प्रभाव प्राणघातक ठरू शकतात. पण बव्हंशी प्रकरणातील सर्वात मोठा धोका हा असतो की रुग्ण, प्रमाणित उपचार प्राप्त करण्याची संधी गमावून बसतो. वैद्यकीय उपचारांतील विलंब वा अडथळे यांमुळे कर्कास वाढण्यास वेळ मिळतो आणि त्यामुळे उपचारांची मदत होण्याचा संभव कमी राहतो.


अधिक जाणून घेणे

कर्करुग्ण (किंवा कर्क असलेली मुले असलेले लोक) पर्यायी उपचारपद्धतींचा विचार का करतात ते सहजच समजून घेण्यासारखे आहे. तुम्हाला कर्काशी लढा देण्यासाठी शक्य आहे ते सर्व करायचे असते आणि कमी किंवा अजिबात उप-प्रभाव नसलेले उपचार घेण्याची कल्पना महान वाटत असते. काही वेळेस रसायनोपचारांसारखे वैद्यकीय उपचार स्वीकारण्यास अवघड असतात किंवा ते उपयोगी ठरत नाहीत. पण सत्य हेच असते की ह्या पर्यायी उपचारपद्धतींपैकी बव्हंशी उपचार तपासले गेलेले नाहीत आणि कर्कोपचारांकरता उपयुक्त सिद्धही झालेले नाहीत.

तुम्ही तुमचे पर्याय विचारात घेत असता खालील तीन पायर्‍यांचा अवलंब करू शकता.
  • “लाल बावटा” शोधत राहा, जो घोटाळा सुचवितो.
  • विचाराधीन उपचारपद्धत सर्व किंवा बव्हंशी कर्क बरा करण्याची आशा दाखविते काय? तुम्हाला नियमित वैद्यकीय उपचार बंद करण्यास सांगण्यात आलेले आहे काय? विचाराधीन उपचारपद्धत “गुप्त” आहे काय, जिच्यात तुम्हाला तुमच्या मुलास, विशिष्ट सेवापुरवठादारांकडे किंवा दुसर्‍या देशात घेऊन जावे लागणार आहे काय?
  • विचाराधीन उपचारपद्धतीबाबत तुमच्या डॉक्टरांशी किंवा परिचारकाशी बोला.

निवड तुमचीच असते

तुमच्या उपचारपद्धतीची निवड तुमचीच असते. जर तुम्हाला प्रमाणीत नसलेली उपचार-पद्धती अवलंबायची असेल तर त्या पद्धतीबद्दल शक्य त्या सर्व गोष्टी समजून घ्या आणि त्याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला. चांगल्या माहितीसह आणि आरोग्य-निगा-चमूच्या आधाराने, धोकादायक असलेल्या उपचारपद्धती टाळून, उपयोगी ठरू शकेल अशी उपचारपद्धत तुम्ही सुरक्षितपणे वापरून घेऊ शकाल.

युईंग्ज अर्बुदांचे अवस्थांनुरूप उपचार

युईंग्ज अर्बुदांचे उपचार मुख्यतः निदानसमयी आढळून आलेल्या अर्बुदाच्या जागेवर आणि त्या वेळच्या त्याच्या विस्तारावर आधारलेले असतात.


स्थलसीमित युईंग्ज अर्बुदे

आधीच उल्लेख केल्यानुसार स्थलसीमित युईंग्ज अर्बुदे असलेल्या अनेक मुलांतही शरीराच्या इतर भागांत, चित्रक-चाचण्यांत दिसून येण्याचे दृष्टीने खूपच लहान प्रमाणात असलेला कर्क फैलावलेला असू शकतो. जर ह्या मुलांना रसायनोपचार मिळाले नाहीत तर, हा लहान प्रमाणात असलेला कर्क यथावकाश मोठ्या अर्बुदांत परिणत होऊ शकतो. म्हणूनच शरीराच्या सर्व भागांत पोहोचू शकणारे रसायनोपचार, हा स्थलसीमित युईंग्ज अर्बुदे असलेल्या मुलांत, उपचारांचा महत्त्वाचा भाग असतो.

युईंग्ज अर्बुदांचे निदान झाल्यानंतर, पहिले उपचार हे रसायनोपचार असतात. ते शल्यक्रिया किंवा प्रारणोपचार यांचे पूर्वीच दिले जात असल्याने त्यांना निओऍडजुव्हंट रसायनोपचार असे संबोधले जात असते. उपचार क्षेत्र (रेजिमेन) हे बहुधा व्ही.ए.सी./आय.ई. म्हणून ओळखले जाते. त्याच औषधांचे इतर संयोगही प्रभावी ठरत असले तरीही, ते उपचारक्षेत्र व्हिन्क्रिस्टाईन, डोक्सोरुबिसिन (ऍड्रिआमायसिन) व सायक्लोफॉस्फॉमाईड आणि पर्यायाने ईफॉस्फॉमाईड आणि एटोपोसाईड यांच्या संयोगाने (व्ही.ए.सी./आय.ई.) केलेल्या उपचारांचे असते.

किमान १२ सप्ताहांच्या रसायनोपचारांनंतर, अर्बुद, शल्यक्रिया करून काढून टाकण्याचे दृष्टीने संकोचत आहे की नाही हे पाहण्याकरता; संगणित-त्रिमिती-चित्रण, चुंबकीय-अनुनादी-चित्रण, धन-विजक-उत्सर्जक-त्रिमिती-चित्रण किंवा अस्थी-चित्रांकन अशा प्रकारच्या चाचण्या केल्या जात असतात.

जर तसे असेल तर, ह्या अवस्थेत शल्यक्रिया केली जाते. शल्यक्रियेच्या स्थळाच्या कडांवरील नमुन्यात जर कर्क आढळून आला तर (म्हणजे कर्कपेशी शिल्लक राहून गेल्या असण्याची शक्यता असल्यास), प्रारणोपचार आणि रसायनोपचार (अनेक महिन्यांकरता) उपयोगात आणले जातात. जर शल्यक्रियेच्या स्थळाच्या कडांवरील नमुन्यात कर्क आढळून आला नाही तर, प्रारणोपचार न करताही रसायनोपचार दिले जाऊ शकतात.

जर अर्बुद वाढत नसेल, पण सुरूवातीच्या रसायनोपचारांनंतर शल्यक्रियेचा पर्याय उपलब्ध नसेल तर, बहुधा त्यानंतर (रसायनोपचारांसहित) प्रारणोपचार दिले जातात. काही प्रकरणांत ह्यामुळे अर्बुद पुरेसे संकोचते आणि शल्यक्रिया केली जाऊ शकते. त्यानंतर मग प्रारणोपचार आणि रसायनोपचार दिले जातात. शल्यक्रियेचा पर्याय उपलब्ध नसेल अशा इतर प्रकरणांत, प्रारणोपचार आणि रसायनोपचार हेच मुख्य उपचारांचा भाग असतात.

जर युईंग्ज अर्बुद सुरूवातीच्या रसायनोपचारांनंतरही वाढतच राहिले तर, एका दुसर्‍या प्रकारचे (निराळी औषधे वापरून दिलेले) रसायनोपचार वापरून पाहिले जातात. अर्बुद नियंत्रणात ठेवण्याकरता, शल्यक्रिया किंवा प्रारणोपचार यांचाही उपयोग करून पाहिला जात असतो. त्यानंतर आणखीन रसायनोपचार दिले जातात.

प्रसृत युईंग्ज अर्बुदे

प्रथम-निदान-समयीच प्रसृत अवस्थेतील रोग असलेल्या रुग्णांवर उपचार करणे, स्थलसीमित रोग असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यापेक्षा कठीण असते. कर्कप्रसार इतर अस्थींत किंवा अस्थीमज्जेत झालेला असतो त्यापेक्षा तो केवळ फुफ्फुसांपर्यंत सीमित असेल तर, रोगनिदान चांगले होऊ शकते.

प्रसृत अवस्थेतील रोगावरील उपचार अनेक बाबतीत स्थलसीमित रोगांवरील उपचारांसारखेच असतात, मात्र ते अधिक प्रखर असू शकतात. पहिले उपचार रसायनोपचारच असतात. अनेकदा स्थलसीमित रोगांवरील उपचारांसारखेच पण त्याच उपचारक्षेत्रात प्रखर रसायनोपचार देऊन केले जातात. काही महिन्यांनंतर, कर्क उपचारांना कसा प्रतिसाद देत आहे ते समजण्यासाठी; संगणित-त्रिमिती-चित्रण, चुंबकीय-अनुनादी-चित्रण, धन-विजक-उत्सर्जक-त्रिमिती-चित्रण किंवा अस्थी-चित्रांकन अशा प्रकारच्या चाचण्या व अर्बुद-नमुना-निष्कर्षण-शल्यक्रियाही केल्या जात असतात.

जर कर्क केवळ लहान भागांवरच पसरला असेल तर, प्रमुख (प्राथमिक) अर्बुद आणि सर्व ज्ञात प्रसारक्षेत्रे ह्याच वेळी शल्यक्रियेने काढून टाकली जातात. शल्यक्रिया व प्रारणोपचार किंवा केवळ प्रारणोपचारांसारखे इतर पर्याय; फुफ्फुसासहित सर्व प्रकारच्या प्रसार-स्थळांवर वापरून पाहिले जाऊ शकतात. ह्या उपचारांदरम्यान आणि नंतरही अनेक महिन्यांपर्यंत रसायनोपचारही दिले जात असतातच.

अनेक कर्ककेंद्रांवरील डॉक्टर हल्ली, अशा रुग्णांवरील उपचारांच्या प्रभावांत सुधारणा घडवून आणण्याकरता, खूप तीव्र रसायनोपचार देऊन मग मूल-पेशी-प्रत्यारोपणाचा प्रयत्न अभ्यासत आहेत.

अशी अर्बुदे उपचारांकरता अवघड असल्याने, अनेक प्रकरणांत, नवीन उपचारांच्या वैद्यकीय चाचण्या, हा एक चांगला पर्याय असू शकतो.

उपचारांनंतर पुन्हा परतून येणारी युईंग्ज अर्बुदे

युईंग्ज अर्बुदे उपचारांनंतर पुन्हा परतून येण्याची संभावना, भूतकाळातल्यापेक्षा हल्ली कमी असते. पण असे घडू शकते. असे घडून आल्यास, उपचार अनेक घटकांवर अवलंबून असतात. त्यात खालील घटकांचा समावेश होत असतो.
  • अर्बुदाचे स्थान आणि आकार
  • अर्बुद शरीराच्या इतर भागांत प्रसृत झालेले आहे की नाही
  • पूर्वी कोणत्या प्रकारचे उपचार दिलेले होते
  • उपचारांनंतर किती काळ लोटला आहे

रसायनोपचार, शल्यक्रिया, प्रारणोपचार किंवा यांचा कुठला संयोग, पुनरावर्ती अर्बुदांच्या उपचारार्थ वापरला जाऊ शकतो, ते परिस्थितीवर अवलंबून असते. डॉक्टर, उच्च-मात्रा रसायनोपचार व त्यानंतर मूल-पेशी-प्रत्यारोपण आणि एकव्यक्ती-प्रतिपिंडे (मोनोक्लोनल-अँटिबॉडीज) म्हणवली जाणारी लक्ष्यवेधी (टार्गेटेड) औषधे, यांचा अभ्यास करत आहेत, पण हे अजूनही स्पष्ट झालेले नाही की असे उपचार कितपत उपयोगी ठरतात. अशी अर्बुदे अवघड ठरू शकतात, म्हणून नवीन उपचारांच्या वैद्यकीय चाचण्या चांगले पर्याय ठरू शकतात.


युईंग्ज अर्बुदे-भाग एकूण ६ पैकी ३


युईंग्ज अर्बुदांचे अवस्थांकन कसे केले जाते?

एकदा युईंग्ज अर्बुदांचे निदान झाले की कर्काची अवस्था (आणि कर्कप्रसाराच्या मर्यादा) निर्धारित करण्याकरता चाचण्या केल्या जातात. युईंग्ज अर्बुदांची अवस्था ही, व्यक्तीचे पेरिप्रेक्ष्य (रोग वा आजाराची संभाव्य वाटचाल) निर्धारित करण्यात आणि नंतर उपचारांची निवड करण्यात एक महत्त्वाचा घटक असते.

युईंग्ज अर्बुदांचे निदान कसे केले जाते?” ह्या अनुभागात वर्णिल्याप्रमाणे, चित्रक चाचण्या व मुख्य अर्बुद आणि इतर ऊतींच्या नमुना-निष्कर्षण-शल्यक्रिया यांचे फलस्वरूपच अवस्थांकन केले जात असते.

अवस्थांकन प्रणाली हा एक प्रमाणित मार्ग असतो, ज्याद्वारे कर्क-निगा-चमू कर्क-प्रसाराच्या मर्यादांचे वर्णन करत असते. युईंग्ज अर्बुदांकरताची, औपचारिक (आणि अधिक तपशीलवार) अवस्थांकन प्रणाली आहे “अमेरिकन जॉईंट कमिटी ऑन कॅन्सर” ह्यांची प्रणाली. जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला तिचा संदर्भ दिला तर, तुम्हाला कळण्यास मदत व्हावी म्हणून, इथे तिचे वर्णन केलेले आहे. मात्र व्यवहारातील उद्दिष्टांकरता, डॉक्टर्स बहुधा साध्या प्रणालीच वापरत असतात, ज्यात स्थानिक किंवा प्रसार-अवस्था-गटांत, युईंग्ज अर्बुदांची वर्गवारी केली जात असते. हिचे वर्णन खालीही दिलेले आहेच.

अस्थी-कर्काकरताची “अमेरिकन जॉईंट कमिटी ऑन कॅन्सर” ह्यांची अवस्थांकन प्रणाली

बहुतेक कर्क-प्रकारांकरता, “अमेरिकन जॉईंट कमिटी ऑन कॅन्सर”ने एक अवस्थांकन प्रणाली विकसित केलेली आहे. “अमेरिकन जॉईंट कमिटी ऑन कॅन्सर” ही संस्था, सर्व अस्थी-कर्कांच्या वर्णनाकरता एकच अवस्थांकन प्रणाली वापरते. (जे कर्क अस्थीत सुरू होत नाहीत अशा) अस्थीबाह्य युईंग्ज अर्बुदांचे अवस्थांकन निराळ्या प्रकारे केले जाते. त्यांचे अवस्थांकन मऊ ऊतींच्या मांस-अर्बुदांप्रमाणे केले जाते.मऊ ऊतींच्या मांस-अर्बुदांचे अवस्थांकनाबाबतची माहिती, आमच्या “मांस-अर्बुदः प्रौढ मऊ ऊतींचा कर्क”, ह्या नावाने ओळखल्या जाणार्‍या दस्तात मिळू शकेल. अस्थी-कर्काकरताची “अमेरिकन जॉईंट कमिटी ऑन कॅन्सर”ची अवस्थांकन प्रणाली चार कळीच्या माहिती-तुकड्यांवर आधारलेली असते, ज्यांना इंग्रजी टी., एन. एम. आणि जी. ह्या अक्षरांनी व्यक्त केले जाते.

टी.    हा तुकडा, मुख्य (प्राथमिक) अर्बुदा (ट्युमर वरून टी.) च्या आकाराचे वर्णन करतो आणि अस्थीच्या निरनिराळ्या भागांत तो आढळून येतो की नाही ते सांगत असतो.
एन.   हा तुकडा, नजीकच्या (स्थानिक) लसिका-जोडां (नोड वरून एन.) तील प्रसाराच्या मर्यादांचे वर्णन करतो. लसिका जोड म्हणजे लहान, वालाच्या आकाराच्या अबाधित-प्रणाली-पेशींचा संग्रह. अस्थी-अर्बुदे क्वचितच लसिका-जोडांत प्रसृत होत असतात.
एम.   हा तुकडा, शरीराच्या इतर अवयवांत कर्क-प्रसार (मेटॅस्टॅसाईझ्ड वरून एम.) झालेला आहे किंवा नाही ते सूचित करत असतो. (सर्वात सामान्य प्रसाराच्या जागा ह्या फुफ्फुसे अथवा इतर अस्थी ह्या असतात).
जी.   हा तुकडा, अर्बुदाच्या दर्जाचा (ग्रेडकरता जी.) निदर्शक आहे, जो निष्कर्षित नमुन्यांतील पेशी सूक्ष्मदर्शकाखाली कशा दिसतात ह्याचे वर्णन करत असतो. निम्न-दर्जाच्या-अर्बुद-पेशी सामान्य पेशींसारख्या जास्त दिसतात आणि त्या झपाट्याने वाढणे अथवा त्यांचा झपाट्याने प्रसार होणे संभवनीय नसते; तर उच्च-दर्जाच्या-अर्बुद-पेशी अधिक अपसामान्य दिसतात. (सर्वच युईंग्ज अर्बुदे उच्च-दर्जाची-अर्बुदे मानली जातात).

टी., एन. एम. आणि जी. ह्या अक्षरांपाठोपाठ येणारे अंक अथवा अक्षरे ह्या प्रत्येक घटकाबाबत अधिक तपशील पुरवितात.

टी.एन.एम. अवस्था-गट

एकदा का टी., एन. आणि एम. वर्गवारी आणि अस्थीकर्काचा दर्जा निर्धारित झाला की, ही माहिती एकत्रित केली जाते, आणि एकूण अवस्थेच्या स्वरूपात व्यक्त केली जाते. अवस्थेचा अंक देण्याच्या प्रक्रियेस अवस्था-गट-अंकन म्हटले जाते. अवस्था, रोमन आकड्यांत ते IV (१ ते ४) दिल्या जातात आणि काही वेळेस आणखीही विभाजित केल्या जातात.

* सर्व युईंग्ज अर्बुदे जी-४ ह्या उच्च दर्जात वर्गीकृत केली जातात, ज्यामुळे अवस्था-I मधे अस्थी कर्क असत नाही.



स्थलसीमित विरुद्ध प्रसृत अवस्था

व्यवहारातयुईंग्ज अर्बुदांचे सर्वात चांगले उपचार कसे करता येतील ते निर्धारित करण्यासाठी, सोप्याशा अवस्थांकन प्रणालीवर डॉक्टर्स विसंबून असतात. अशा प्रणालीत कर्क, स्थानिकिकृत किंवा प्रसृत अशा अवस्थांत वर्गीकृत केले जातात.

स्थलसीमित युईंग्ज अर्बुदे: स्थलसीमित युईंग्ज अर्बुद हे जिथे सुरू झाले त्या एका विशिष्ट भागातच सीमित राहते असे मानले जात असते. ह्यात, स्नायू किंवा अस्थिबंध यांसारख्या जवळपासच्या ऊतींचा समावेश होऊ शकतो. एखादे युईंग्ज अर्बुद हे, चित्रक (क्ष-किरण, संगणित-त्रिमिती-चित्रण-चित्रांकने किंवा चुंबकीय-अनुनादी-चित्रांकने, आणि धन-विजक-उत्सर्जक-त्रिमिती-चित्रण-चित्रांकने अथवा अस्थी-चित्रांकने) चाचण्या आणि अस्थीमज्जा-नमुना-निष्कर्षण व चूषण यांत, इतर दूरस्थ अवयवांत प्रसार नसल्याचे आढळून आल्यानंतरच, स्थलसीमित असल्याचे मानले जाते.

जेव्हा चित्रक चाचण्याही, इतर दूरस्थ अवयवांत प्रसार नसल्याचे दाखवत असतात, तेव्हाही अनेक रुग्णांत सूक्ष्म-प्रसार (चाचण्यांत आढळून न येणारा खूप लहान कर्क-प्रसार) झालेला असू शकतो. म्हणूनच, शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचू शकणारा रसायनोपचार हा, सर्वच युईंग्ज अर्बुदांच्या उपचारातील एक महत्त्वाचा भाग असतो.

प्रसारक्षम युईंग्ज अर्बुद: प्रसारक्षम युईंग्ज अर्बुद हे, जिथे सुरू झाले तिथून शरीराच्या दूरवर असलेल्या भागांत पसरलेले, स्पष्टपणे दिसून येत असते. बहुतेक वेळा, प्रसार हा फुफ्फुसांप्रत किंवा इतर अस्थींप्रत किंवा अस्थीमज्जेप्रत झालेला असतो. प्रसाराच्या कमी प्रचूर असलेल्या जागांत यकृत आणि लसिका-जोडांचा समावेश होत असतो.

सुमारे चार रुग्णांतील एका रुग्णात, प्रसार झाल्याचे चित्रक चाचण्यांत उघडपणे आढळून येते. पण वर उल्लेख केल्यानुसार, इतर अनेक रुग्णांत, शरीराच्या इतर भागांत लहान प्रमाणातील कर्क-प्रसार झालेला असू शकतो, जो चित्रक चाचण्यात दिसून येत नाही.

अवस्थांनुरूप युईंग्ज अर्बुदांतून वाचणार्‍यांचा टिकावदर

व्यक्तीच्या रोगनिदानात्मक परिप्रेक्ष्याची चर्चा करतांना, डॉक्टर अनेकदा टिकावदरांचा उपयोग, प्रमाणित मार्ग म्हणून करत असतात. काही लोकांना, त्यांचेसारख्याच परिस्थितीतील लोकांची टिकाव सांख्यिकी जाणून घेण्याची इच्छा असते, तर इतरांना हे आकडे फारसे उपयुक्त वाटत नाहीत, किंवा त्यांना ते जाणून घेण्याचीही आवश्यकता वाटत नसते. खालील युईंग्ज अर्बुदांकरची टिकाव सांख्यिकी जाणून घेण्याची तुम्हाला इच्छा असो वा नसो, ती खाली दिलेली आहे.

५-वर्षे टिकून राहण्याचा दर, म्हणजे कर्कनिदान झाल्यानंतर किमान ५ वर्षे जिवंत राहणार्‍या रुग्णांची टक्केवारी. अर्थातच, अनेक लोक ५-वर्षांनंतरही खूप अधिक जगत असतात (आणि अनेक बरेही होत असतात). ५-वर्षे टिकून राहण्याचा दर प्राप्त करून घेण्यासाठी डॉक्टरांना, निदान पाच वर्षे पूर्वीपासून उपचार दिलेल्या रुग्णांचा शोध घ्यावा लागत असतो. त्यावेळपासून उपचारांत होत असलेल्या सुधारणांमुळे, आज युईंग्ज अर्बुदांचे निदान केले जात असलेल्या रुग्णांकरता अधिक पक्षकर परिप्रेक्ष्य प्राप्त होऊ शकत असते.

टिकावदर अनेकदा भूतकाळातील मोठ्या संख्येतील रुग्णांवर आधारलेले असू शकतात. मात्र, ते एखाद्या विशिष्ट रुग्णाच्या प्रकरणात पुढे काय होईल ह्याचे भाकीत करू शकत नाहीत. एखाद्या रुग्णाच्या कर्काची अवस्था, परिप्रेक्ष्याचे अनुमान करण्याकरता महत्त्वाची असते. पण वय, अर्बुदाची जागा, आणि कर्क उपचारांस कसा प्रतिसाद देत आहे इत्यादी इतर अनेक घटकही रुग्णाचे परिप्रेक्ष्य प्रभावित करत असतात.

स्थलसीमित अर्बुदेः स्थलसीमित युईंग्ज अर्बुदांच्या रुग्णांकरताचा आधुनिक उपचारांमुळे एकूण ५-वर्ष-टिकावदर हा सुमारे ७०% असतो.

प्रसारक्षम अर्बुदेः निदानाच्या वेळी, कर्क आधीच प्रसृत झालेला असल्याने, ५-वर्ष-टिकावदर हा सुमारे १५ ते ३०% असतो. कर्क प्रसार इतर अवयवांपर्यंत न पोहोचता केवळ फुफ्फुसांपर्यंतच मर्यादित राहिला तर, टिकावदर किंचित बरा राहत असतो.

रोगनिदान प्रभावित करणारे इतर घटकः कर्काच्या अवस्थेव्यतिरिक्त इतर घटकही टिकावदर प्रभावित करत असतात. पक्षकर रोगनिदानाशी जोडले गेलेल्या घटकांत खालील घटकांचा समावेश होत असतो.

  • लहान अर्बुद आकार
  • मुख्य अर्बुद (छाती किंवा पुठ्ठ्यावर असण्याऐवजी) हाता-अथवा-पायावर स्थित असणे
  • रक्तातील सामान्य एल.डी.एच. पातळ्या
  • रसायनोपचारास अर्बुदाचा मिळणारा पक्षकर प्रतिसाद
  • वय १० वर्षांपेक्षा कमी असणे

ह्या घटकांना विचारात घेत असतांनाही, टिकावदर केवळ सर्वोत्तम अनुमानेच असत असतात. तुमच्या मुलाचे डॉक्टर हे सांगू शकतील की, हे आकडे कितपत लागू पडतात, कारण ते तुमच्या मुलाच्या विशिष्ट परिस्थितीशी अवगत असतात.

युईंग्ज अर्बुदांवर उपचार कसे केले जातात?

ही माहितीअमेरिकन-कॅन्सर-सोसायटीच्याकर्क-माहिती-विदागार (डाटाबेस)-संपादन-महामंडळात काम करत असलेले डॉक्टर्स आणि परिचारिका ह्यांचे दृष्टीकोन व्यक्त करते. हे दृष्टीकोन वैद्यकीय नियतकालिकांत प्रकाशित झालेल्या त्यांच्या अभ्यासांच्या आणि त्यांच्या व्यक्तिगत व्यावसायिक अनुभवांच्या समाकलनांवर आधारलेले असतात.

ह्या दस्तातील उपचारांबाबतची माहिती म्हणजे अमेरिकन-कॅन्सर-सोसायटीचे अधिकृत धोरण नव्हे आणि तुमच्या कर्क-निगा-चमूची विशेषज्ञता आणि निदान ह्यांना पर्यायी वैद्यकीय सल्ला म्हणून तिचा उपयोग व्हावा असा उद्देश नाही. ह्या माहितीचा उपयोगतुम्हालातुमच्या कुटुंबाला आणि डॉक्टरांनामाहितीचे आधारे निर्णय घेण्यास मदत म्हणून व्हावा असा उद्देश आहे.

तुमचे डॉक्टरांना ह्या सर्वसामान्य उपचार पर्यायांहून निराळी उपचार योजना सुचवण्यास कारणे असू शकतात. त्यांना तुमच्याकरता निवडलेल्या उपचार पर्यायांबाबतचे प्रश्न विचारायला संकोच करू नये.

युईंग्ज अर्बुदांच्या उपचारांचा आढावा

युईंग्ज अर्बुदांच्या उपचारांची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे असतात.
१.      रुग्णास बरे करण्याचा प्रयत्न करणे
२.      शरीराच्या प्रभावित भागांचे बहुतांशी कार्य, शक्य तितके शाबूत राखणे
३.      उपचारांच्या दीर्घकालीन गुंतागुंती किमान राखणे

ही उद्दिष्टे साध्य करण्याकरता, अनेक प्रकारच्या डॉक्टरांचा आणि विशेषज्ञांचा समावेश असलेली चमू पद्धत आवश्यक असते. रुग्णास सर्वोत्तम उपचार आणि जगण्याची सर्वोत्तम संभाव्य गुणवत्ता प्राप्त करवून देण्यासाठी; शल्यविशारद, वैद्यकीय अथवा बाल्य अर्बुद-विशेषज्ञ, प्रारण-अर्बुद-विशेषज्ञ, रोगनिदानतज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि पुनर्वसन विशेषज्ञ एकत्रितरीत्या काम करतात. बालकांकरता आणि कुमारांकरता हे काम मुलांच्या कर्ककेंद्रातच सर्वोत्तमरीत्या साधले जाऊ शकत असते.

युईंग्ज अर्बुदे असलेल्या बहुतेक रुग्णांना वैद्यकीय-चाचण्यांत, मसुदा (प्रोटोकोल) म्हटल्या जाणार्‍या राष्ट्रीय-उपचार-मार्गदर्शक-तत्त्वांनुसार उपचार दिले जात असतात. अमेरिकेत, काही सर्वात यशस्वी मसुदे (प्रोटोकोल्स), बाल्य-अर्बुदशास्त्र-गटाने आणि त्यांच्या पूर्व-संस्थांचे (फोर-रनर्स) आहेत. युरोपातील अशांसारख्या गटांच्या अभ्यासांनीही खूपच महत्त्वाची माहिती प्राप्त केलेली आहे. युईंग्ज अर्बुदांच्या उपचारांतील सर्वात प्रगत उपचार, ह्याच वैद्यकीय चाचण्यांतून प्राप्त झालेले आहेत.

युईंग्ज अर्बुदांच्या उपचारांच्या प्रकारांत शल्यक्रिया, रसायनोपचार आणि प्रारणोपचारांचा समावेश होत असतो. बहुतेक सर्व प्रकरणांत रसायनोपचार प्रथम दिले जातात. स्थलसीमित उपचारपद्धती (शल्यक्रिया आणि किंवा प्रारणोपचार) त्यानंतर वापरल्या जात असतात. अनेकदा त्यानंतरही आणखी रसायनोपचार दिले जात असतात.

पुढील काही अनुभाग युईंग्ज अर्बुदांकरता वापरल्या जाणार्‍या उपचारांच्या प्रकारांचे वर्णन देतील. त्यानंतर कर्काच्या अवस्थेवर (मर्यादेवर) आधारित सर्वात सामान्य उपचार पद्धतींची वर्णने दिलेली आहेत.

युईंग्ज अर्बुदांकरताच्या रसायनोपचार पद्धती

रसायनोपचार (केमोथेरपी किंवा नुसतेच केमो) कर्कविरोधी औषधांचा वापर करतात. ही औषधे शिरेतून किंवा तोंडावाटे (गोळ्यांच्या स्वरूपात) दिली जातात. ही औषधे रक्तात उतरून शरीराच्या सर्व भागांत पोहोचतात.

युईंग्ज अर्बुदांचे अवस्थांकन कसे केले जाते?” हा अनुभाग असे नोंदवितो की, स्थलसीमित युईंग्ज अर्बुदे असणार्‍या रुग्णांच्या अस्थीमज्जा-नमुन्यांत किंवा चित्रक-चाचण्यांत उघड कर्कप्रसार झालेला दिसत नसतो. तरीही ह्यापैकी अनेक रुग्णांत कर्कप्रसाराची लहान लहान क्षेत्रे असतात, जी अशा चाचण्यांत दिसण्याचे दृष्टीने खूपच लहान असतात. अशा रुग्णांना जर रसायनोपचार दिले गेले नाहीत तर, असे लहान प्रसार पुढे मोठ्या अर्बुदांत विकसित होऊ शकत असतात.

म्हणूनच युईंग्ज अर्बुदे असणार्‍या जवळपास सर्व रुग्णांच्या उपचारांचे, रसायनोपचार हे एक भाग असतात. प्रातिनिधिकरीत्या हे उपचार म्हणजे पहिल्यांदा दिले जाणारे उपचार असतात, त्यानंतर शल्यक्रिया केली जाते आणि / किंवा प्रारणोपचार दिले जातात. त्यानंतरही अनेकदा रसायनोपचार दिले जातात.

युईंग्ज अर्बुदे असणार्‍या रुग्णांच्या उपचारारार्थ अनेक रसायनौषधींचा संयोग उपयोगात आणला जातो. अमेरिकेत, अशाप्रकारचे दोन संयोग आलटून पालटून प्रत्येकी २ ते ३ सप्ताहांनी दिले जाणे हे सर्वसामान्य आहे (ह्यालाच व्ही.ए.सी./आय.ई. रेजिमेन म्हणून ओळखले जाते). औषधांच्या पहिल्या संचात व्हिन्क्रिस्टाईन, डोक्सोरुबिसिन (ऍड्रिआमायसिन) आणि सायक्लोफॉस्फॉमाईड ह्यांचा समावेश होत असतो. ह्या औषधांच्या प्रभावांतून रुग्ण सावरल्यावर, औषधांचा दुसरा संयोग दिला जातो. ह्यात ईफॉस्फॉमाईड आणि एटोपोसाईड ह्यांचा समावेश होत असतो. काही डॉक्टर औषधांचे काहीसे निराळे संयोगही वापरू शकतात.

अर्बुदास शल्यक्रियेपूर्वी किंवा प्रारणोपचारांपूर्वी रसायनोपचार निदान १२ ते २४ सप्ताह तरी दिले जातात आणि त्यानंतरही दिले जातात (बहुधा एकूण १४ ते १५ आवर्तनांपर्यंत). जर अर्बुद पसरले असेल तर, हीच औषधे वाढत्या मात्रेत दिली जाऊ शकतात.

युईंग्ज अर्बुदांचे निदान झाल्यावर लगेचच (आणि रसायनोपचार सुरू करण्यापूर्वी), डॉक्टर एक शिरा-प्रवेशन-साधन रुग्णाच्या छातीतील मोठ्या शिरेत शिरवण्यास सुचवतील. हे साधन हा एक प्रवेशक (पोकळ नळी) असतो जो शल्यक्रियेद्वारे रुग्णास संपूर्ण भूल देऊन शिरवला जात असतो. ह्या प्रवेशकाचे एक टोक शिरेत राहते, तर दुसरे टोक जेमतेम त्वचेच्या आत अथवा बाहेर राहते. ह्यामुळे आरोग्य-निगा-चमूस रसायने आणि इतर औषधे रक्त-प्रणालीत शिरवणे, तसेच प्रत्येक वेळी शिरेस टोचावे न लागता रक्त-नमुने काढून घेणे शक्य होते. हे साधन बहुधा अनेक महिनेपर्यंत जागीच राहू शकते. ह्यामुळे रसायनोपचार घेणे रुग्णासाठी कमी दुःखमय ठरते. तुमच्या मुलाच्या बाबतीत असे साधन वापरलेले असल्यास, आरोग्य-निगा-चमू तुम्हाला त्याची काळजी कशी घ्यावी शिकवेल, जेणे करून संसर्गासारख्या समस्येचा धोका घटवता येईल.


रसायनोपचारांचे संभाव्य उप-प्रभाव

रसायनौषधे जलदीने विभाजित होणार्‍या पेशींवर आक्रमण करत असतात, म्हणूनच ती कर्कपेशींविरुद्ध कार्य करत असतात. पण अस्थीमज्जेतील, तोंड व आतड्याच्या अस्तरांतील तसेच केशमुळांतील पेशींसारख्या शरीरातील इतर पेशीही जलदीने विभाजित होत असतात. ह्या पेशीही त्यामुळे रसायनोपचारांनी प्रभावित होऊ शकतात, ज्यामुळे उप-प्रभाव निर्माण होत असतात.

प्रौढांपेक्षा मुलांना रसायनोपचार अधिक लाभदायक ठरतात. त्यांना होणारे उप-प्रभाव कमी गंभीर असतात आणि ते त्यांतून अधिक वेगाने सावरतात. त्यामुळे अर्बुदास मारून टाकण्यासाठी, डॉक्टर मुलांना अधिक मात्रेतील रसायनोपचार देऊ शकतात.

रसायनोपचारांचे उपप्रभाव औषधाच्या प्रकारांवर, मात्रांवर आणि उपचार कालांवर अवलंबून असतात.

सामान्य उप-प्रभावः रसायनौषधांच्या सामान्य उप-प्रभावांत खालील उप-प्रभावांचा समावेश होत असतो.
१.      केस गळणे
२.      तोंड येणे
३.      भूक न लागणे
४.      मळमळ व वांत्या होणे
५.      अतिसार
६.      संसर्गप्रवणता (कमी झालेल्या पांढर्‍या पेशींच्या संख्येमुळे)
७.      सहज जखम वा रक्तस्त्रावप्रवणता (कमी झालेल्या बिंबाणू संख्येमुळे)
८.      थकवा (कमी झालेल्या लाल रक्तपेशींच्या संख्येमुळे)

ह्यांपैकी बहुतांशी उप-प्रभाव अल्पकालीन असतात आणि उपचार संपल्यानंतर नाहीसे होतात. हे उप-प्रभाव कमी करण्याचे उपायही असतात. उदाहरणार्थ, मळमळ व वांत्या रोखण्याकरता किंवा रक्तगणना सामान्य पातळ्यांइतकी होण्याकरता उपयुक्त ठरू शकतील अशी औषधे दिली जाऊ शकतात. उप-प्रभावांबाबत तुम्हाला असलेल्या प्रश्नांची आरोग्य-निगा-चमूशी चर्चा करा.

काही औषधांचे उप-प्रभावः वर सूचित केलेल्या प्रभावांसोबतच, काही रसायनौषधांचे विशिष्ट उप-प्रभावही असू शकतात.

सायक्लोफॉस्फॉमाईड आणि ईफॉस्फॉमाईड हे मूत्राशयास हानी पोहोचवू शकतात, ज्यामुळे मूत्रात रक्त येऊ शकते. हे घडून येण्याची शक्यता, विपुल प्रमाणात द्रव असलेली औषधे आणि मेस्ना नावाचे मूत्राशय-संरक्षक औषध देऊन घटवली जाऊ शकते. ही औषधे बिजांडकोश किंवा अंडकोशासही हानी पोहोचवू शकतात, ज्यामुळे प्रजोत्पादनक्षमता प्रभावित होत असते.

डोक्सोरुबिसिन हृदयास हानी पोहोचवू शकते. हे घडून येण्याचा धोका, दिलेल्या औषधाच्या एकूण मात्रेसोबतच वाढत जातो. डॉक्टर्स, संस्तुत मात्रेपेक्षा जास्त डोक्सोरुबिसिन हे औषध न देऊन, आणि उपचारांदरम्यान प्रतिध्वनी-हृदयालेखाद्वारे (ईको-कार्डिओग्राम) तपास करून, हा धोका शक्य तितका कमी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.

व्हिन्क्रिस्टाईन मज्जातंतुंना हानी पोहोचवू शकते. काही रुग्ण, झिणझिण्या किंवा बधीरता येणे अनुभवू शकतात. विशेषतः हाता-पायांत.

युईंग्ज अर्बुदांच्या उपचारार्थ वापरण्यात येणार्‍या, एटोपोसाईड सारखी काही औषधे, नंतर पांढर्‍या रक्तपेशींचा कर्क, जो ऍक्यूट मायलॉईड ल्युकेमिया म्हणून ओळखला जातो तो, विकसित होण्याचा धोका वाढवू शकतात. सुदैवाने, हे वारंवार घडून येत नाही.

दीर्घकालीन उप-प्रभावः काही उप-प्रभाव नाहीसे होत नाहीत किंवा उपचार संपल्यानंतर अनेक वर्षेपर्यंत व्यक्तही होत नाहीत. ह्याकरता खालील उदाहरणे देता येतील.
१.      वंध्यत्व
२.      हृदयहानी
३.      दुसर्‍या कर्काचा विकास

ह्यांपैकी काही दीर्घकालीन प्रभाव “युईंग्ज अर्बुदांच्या उपचारांनंतर काय होत असते?” ह्या अनुभागात वर्णिलेले आहेत.

रसायनोपचारांचे उप-प्रभाव तपासण्याकरताच्या चाचण्याः प्रत्येक रसायनोपचार घेण्यापूर्वी तुमचे डॉक्टर प्रयोगशालेय चाचण्यांचे निष्कर्ष तपासून, यकृत, मूत्रपिंड आणि अस्थीमज्जा यांची कार्ये व्यवस्थित सुरू असल्याची खात्री करून घेतील. नसल्यास रसायनोपचार लांबणीवर टाकावे लागतील किंवा त्यांच्या मात्रा घटवाव्या लागतील.

संपूर्ण-रक्त-गणनेत पांढर्‍या रक्तपेशींचा, लाल रक्तपेशींचा, आणि रक्तातील बिंबाणूंचा समावेश होत असतो. रसायनोपचार ह्या रक्तपेशींची संख्या घटवू शकत असतात. म्हणून रसायनोपचारांदरम्यान आणि रसायनोपचारांनंतरही रक्तगणनेवर बारीक लक्ष ठेवले जात असते. रसायनोपचार दिल्यावर सुमारे दोन सप्ताहांनंतर ह्या पेशी निम्नतम पातळीप्रत पोहोचत असतात. उच्च मात्रा वापरलेल्या असल्यास हे आधीही घडून येऊ शकते.

रक्त-रसायन-चाचण्या रक्तातील काही रसायनांची मोजमाप करतात, ज्या डॉक्तरांना यकृत आणि मूत्रपिंडे कशी कार्ये करत आहेत ते सांगू शकतात. काही रसायनौषधे मूत्रपिंडे व यकृतास हानी पोहोचवू शकत असतात.

जर डोक्सोरुबिसिन (ऍड्रिआमायसिन) द्यावयाचे असेल तर, प्रतिध्वनी-हृदयालेखन (हृदयाची ध्वन्यातीत चाचणी) यासारख्या चाचण्या, उपचारांपूर्वी आणि उपचारांदरम्यानही हृदयकार्य जाणून घेण्यासाठी, केल्या जाऊ शकतात.

युईंग्ज अर्बुदांवरील शल्यक्रिया

युईंग्ज अर्बुदांकरता अनेक प्रकारच्या शल्यक्रियांचा उपयोग करता येतो. अर्बुदाच्या आकार आणि स्थानावर, तसेच शरीराच्या प्रभावित भागाचे कार्य शल्यक्रियेमुळे कशाप्रकारे बदलेल ह्यावर अवलंबून निवड करता येते.

मऊ ऊतींतील आणि काही अस्थींतील अनेक अर्बुदे मोठी अपंगिता (डिसऍबिलिटी) किंवा विकृती (डिफॉर्मिटी) आल्याविना, काढून टाकली जाऊ शकतात. हाता-पायांच्या अस्थींतील बहुतांश इतर अर्बुदे, हाता वा पायाचे कार्य प्रभावित झाल्याविना, संपूर्णतः काढून टाकली जाऊ शकत नाहीत.

हाता वा पायातील अर्बुदेः बव्हंशी प्रकरणांत हाता वा पायाचे कार्य अबाधित राखणारी शल्यक्रिया करून, हाता वा पायास मूलतः शाबूत राखून, प्रभावित झालेले संपूर्ण किंवा आंशिक हाड काढून टाकणे शक्य असते. काढून टाकलेले हाड; कलमाद्वारे (शरीरातील इतर भागातील अथवा इतर व्यक्तीतील हाडाने), किंवा धातू वा इतर पदार्थापासून बनवलेल्या अंतर्गत कृत्रिम अवयवाद्वारे (मनुष्यनिर्मित आंशिक वा संपूर्ण हाडाने) बदलवले जाते.

जर अर्बुद पायाच्या वरच्या भागात असेल तर, गुढघ्यासकट मांडीचे हाड काढून टाकले जाऊ शकते. ह्या हाडा व गुढघ्याकरता कृत्रिम हाड आणि गुढघ्याचा सांधा खालच्या भागाशी जोडण्याकरता, बदलवला जाऊ शकतो. मात्र, खालच्या पायाचे भाग काढून टाकणे आणि त्यांची पुनर्बांधणी करणे अवघड असते. अवयव वाचवण्याच्या शल्यक्रियेसाठी दंडाचे हाड उपयुक्त ठरत असते, कारण त्यावर शरीराचे वजन पडत नसते.

अवयव वाचवण्याची शल्यक्रिया खूपच गुंतागुंतीची असते. ती करणारा शल्यविशारद विशेष कुशल आणि अनुभवी असावा लागतो. आजूबाजूचे अस्थीबंध, मज्जातंतू, आणि रक्तवाहिन्या आणि शक्यतोवर अवयवाचे कार्य व दर्शन शाबूत राखत; संपूर्ण अर्बुद काढून टाकण्याचे आव्हान त्या शल्यविशारदापुढे असते. मात्र जर कर्क ह्या संरचनांतही वाढला असेल तर, त्याही अर्बुदासोबतच काढून टाकाव्या लागतील. अशा प्रकरणांत प्रारणोपचार किंवा अवयव उच्छेद (संपूर्ण अवयव काढून टाकणे) हाच काही वेळेस सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

विशेषतः बालकांत अंतर्गत कृत्रिम साधन बसवणे आव्हानात्मक असते. वाढत्या वयासोबत बालकातील असे साधन, अधिक लांबीचे करून बसविणेही पारंपारिकरीत्या करावे लागत आलेले आहे. नवीन साधने अतिशय सुलभ करण्यात आलेली आहेत. कुठल्याही अतिरिक्त शल्यक्रियेविनाच त्यातील काहींची लांबी वाढवली जाऊ शकते. त्यांच्यात लहानशी साधने असतात, जी मूळ साधनाची लांबी, मुलाच्या वाढीसोबत आवश्यक ठरणार्‍या लांबीनुरूप वाढवून देऊ शकतात. मात्र, मुलाचे वाढीचे वय सरल्यावर प्रौढ वयात असे कृत्रिम अवयवही बदलावे लागू शकतात.

पायावरील अवयव वाचविणार्‍या शल्यक्रियेनंतर, रुग्णांना चालणे शिकून घेण्यास, सरासरीने सुमारे एक वर्ष लागते. जर रुग्णाने पुनर्वसन कार्यक्रमात भाग घेतला नाही तर, वाचविण्यात आलेला अवयव निकामी ठरू शकतो.

अर्बुद, अवयव बदलविण्यास अवघड जागी असल्याने किंवा अर्बुद, जीवनावश्यक मज्जातंतूंत वा रक्तवाहिन्यांत विस्तारलेले असल्याने, अवयवास गंभीर हानी न पोहोचता; काही मुलांवर अवयव-वाचविणारी-शल्यक्रिया करणे शक्य नसते. अशा मुलांना बहुधा शल्यक्रियेऐवजी प्रारणोपचार दिले जातात. क्वचित, प्रभावित अवयवाचा उच्छेद (संपूर्ण अवयव काढून टाकणे) हाच काही वेळेस सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.


छातीच्या भिंतीतील किंवा पुठ्ठ्याच्या हाडातील अर्बुदे

छातीच्या भिंतीतील युईंग्ज अर्बुदांकरता, शल्यविशारदास अनेकदा रोगग्रस्त भाग आणि जवळपासच्या फासळ्याही काढून टाकाव्या लागत असतात. छातीच्या भिंतीतील विकृती बुजविण्याकरता, फासळ्या, मनुष्यनिर्मित पदार्थांनी बदलविल्या जातात. जर मुलाचा कर्क फुफ्फुसांपर्यंत प्रसृत झालेला असेल तर, छाती उघडून फुफ्फुसांतील अर्बुद काढून टाकले जाऊ शकते. ह्या शल्यक्रियेस थोरॅकोटोमी असे म्हणतात. अशा मुलांना अनेकदा प्रारणोपचारही दिले जात असतात.

पुठ्ठ्याच्या हाडातील अर्बुदे शल्यक्रियेने उपचार करण्यासाठी कठीण ठरू शकतात आणि अनेक प्रकरणांत प्रारणोपचार पसंतीचे ठरू शकतात. पण जर अर्बुद सुरूवातीच्या रसायनोपचारांना प्रतिसाद देत असेल तर, शल्यक्रिया (काही वेळेस त्यानंतर प्रारणोपचारही) हाही पर्याय ठरू शकतो. शल्यक्रियेनंतर अनेकदा पुठ्ठ्याच्या हाडांची पुनर्बांधणीही केली जाऊ शकते.

शल्यक्रियेचे संभाव्य उप-प्रभाव

शल्यक्रियेच्या अल्पकालीन उप-प्रभावांत जखम योग्य प्रकारे बरी न होणे, शल्यक्रियेच्या जागी रक्तस्त्राव होणे आणि संसर्ग ह्यांचा समावेश होत असतो. अवयव-वाचविणार्‍या-शल्यक्रियेतील गुंतागुंतींत, निखळणार्‍या वा तुटणार्‍या कलम वा दंड यांचा समावेश होत असतो. शल्यक्रियेपूर्वी वा नंतर घेतल्या जाणार्‍या रसायनोपचार व प्रारणोपचारांमुळे जखम बरी होण्यात अडथळे निर्माण होऊ शकत असल्याने, ह्या गुंतागुंती एरव्हीच्या शल्यक्रियांच्या मानाने अधिक संभाव्य असतात.

शल्यक्रियेपश्चातचे पुनर्वसनः उपचारांचा हाच बहुधा सर्वात कठीण भाग असतो आणि इथली चर्चा त्याचे संपूर्ण वर्णन करू शकत नाही. रुग्ण आणि पालक यांनी पुनर्वसन विशेषज्ञास भेटावे आणि सर्व उपलब्ध पर्याय समजून घ्यावेत.

जर एखादा अवयव काढून टाकलेला असेल तर, रुग्णाने कृत्रिम अवयवासोबत जगणे आणि त्याचा वापर करणे शिकून घ्यायला हवे. विशेषतः वाढत्या वयातील मुलांकरता, जर वाढत्या वयासोबत कृत्रिम अवयव बदलावा लागला तर, हे अवघड ठरू शकते.

जेव्हा अवयव-वाचविणार्‍या-शल्यक्रियेत केवळ अर्बुद आणि हाडाचा काही भागच काढून टाकलेला असतो तेव्हा, परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची होऊ शकते. विशेषतः वाढत्या वयातील मुलांत. ज्यांचेवर अवयव-वाचविणारी-शल्यक्रिया झालेली असेल त्या मुलांना नंतरच्या वर्षांत, वाढत्या वयातील शरीराच्या आकारास योग्य ठरणारा कृत्रिम अवयव बदलविण्याकरता आणखीही शल्यक्रियेची आवश्यकता भासू शकते आणि काहींच्यात तर संपूर्ण अवयवच काढून टाकण्याची आवश्यकताही प्राप्त होऊ शकते.

दोन्हीही प्रकारच्या शल्यक्रिया समस्यांप्रत घेऊन जातात तसेच त्यांचे संभाव्य लाभही असतात. उदाहरणार्थ, अवयव काढून टाकणार्‍या शल्यक्रियेपेक्षा, अवयव-वाचविणारी-शल्यक्रिया जरी अधिक स्वीकारार्ह असत असली तरी तिच्यातील क्लिष्टतेमुळे ती अधिकाधिक गुंतागुंतीची होत जाण्याचा कल असतो. अवयव-वाचविणारी-शल्यक्रिया झालेल्या वाढत्या वयातील मुलांना पुढे आणखीही शल्यक्रियांना सामोरे जावे लागू शकते.

जेव्हा संशोधकांनी निरनिराळ्या शल्यक्रियांच्या अंतिम निष्कर्षांवर; आयुष्याच्या गुणवत्तेच्या संदर्भात, दृष्टी टाकली तेव्हा त्यांत थोडाच फरक असल्याचे आढळून आले. बहुधा सर्वात मोठा प्रश्न कुमारवयीन रुग्णांचा होता, ज्यांना त्यांच्या शल्यक्रियेच्या सामाजिक प्रभावांची चिंता होती. भावनिक मुद्देही खूपच महत्त्वाचे ठरू शकतात आणि सर्वच रुग्णांना आधार व प्रेरणा ह्यांची आवश्यकता असते.